मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६

डोळ्यांतला पाऊस ......


                  हल्ली तो लहरी पाऊस खुपच जवळचा वाटतो,

               मेघ भरुन आले नाही तरी डोळ्यांत नेहमी दाटतो....



एकदा अशाच पावसामध्ये तु भेटली होती,
जवळ खेचत तुला मी माझ्या 
मिठीत घेतली होती....



त्याच घट्ट मिठीमध्ये दिलं होतस एक वचन,
विसरणार नाहीस कधीच मला ठेवशील माझी आठवण....

सोबत जगण्या-मरण्याच्या अनेक शपथा दिल्या होत्या...
न विसरता येणाऱ्या अनेक आठवणी दिल्या होत्या....

त्याच दिवसांत स्वप्नांचे कित्येक इमले रचले होते 
सोबत पावसात भिजताना गारांचे खडेही वेचले होते....

पण, तु सोडून जाण्याला आता 
कित्येक दिवस लोटले,
तु गेलीस अन आयुष्यात केवळ अश्रूच मला भेटले....💔

सोबत तु होती ना तेव्हा 
सवय तुझी झाली होती,
इतकं प्रेम दिलस की शेवटी 
व्यसन तु माझं झाली होतीस....

कित्येक पावसाळे बरसून गेलेत आठवणी फक्त राहिल्यात,
तुझ्या मिठीतल्या स्पर्शाच्या जाणिवा फक्त राहिल्यात...

एकटं पावसात भिजण्याची आता हिम्मतच राहिली नाही,
तुझ्याशिवाय या श्वासांनाही 
किम्मत राहिली नाही....

आता भरुन येतात जेव्हा काळे मेघ 
तेव्हा खिडकीत उभा राहतो,
सरीवर सरी कोसळताना 
दुरुनच मी पाहतो....




पावसाच्या त्या सरीँबरोबर
डोळे निरंतर वाहतात,
तुझ्या मिठीची आठवण देऊन
चिंब भिजवत राहतात....!
चिंब भिजवत राहतात.....!!





✒️ ©️कवी : तुषार वाजे

☎️9273572706

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

आई तुझी गाथा .....!!!

(शिक्षणासाठी घरापासून दूर असेलेल्या मुलाने आईची सांगितलेली ही गाथा )
!!!आई तुझी गाथा !!!
आई तुझी गाथा कशी
 सांगू मी जगताला,
आठवून आज  तूला कंठ दाटला, 
आई तुझ्या, आठवणीने आज माझा कंठ दाटला...!

अंगाईची धून तुझ्या गुणगुणते कानात 
बालपणीच्या दिवसांचे काहूर मनात ,
कोरड्या ठन्न डोळ्यांचा ह्या बांध फुटला .......!


लहानपणी अंगामध्ये भरला व्हता ताप 
डोळ्यात वाहे गंगा तुझ्या जागाच सोबती बाप 
आज ठेचाळता पुसतो  मीच रक्ताला ......!

लेकरांच्या सुखासाठी चंदनापरी झिजलीस 
आम्हा देऊनी भाकर तू उपाशी निजलीस 
ऊब तुझ्या मायेची भासता तुझी वाकळ संगतीला ....!

मिणमिणत्या या पणतीला  मशाल केलया
भरकटलेल्या नावेला या किनारी नेलया 
चुकलो जर वाट कधी तुझे शब्द सोबतीला .....!


आठवतो माते तुझा कष्टाळला  घाम 
आई तुला देईन मी सुखाचा आराम ,
लोक सारी सलाम करतील तुझ्या या काठीला ......!


शिकून मी मोठा होईन नाव काढतील लोक 
पायावर माते तुझ्या सुख आणीन कैक 
महाल मी करीन आई आपल्या झोपडीला
पायावर तुझ्या ठेवीन काढून जीवाला ......!
आठवून आज  तूला कंठ दाटला, 
आई तुझ्या, आठवणीने आज माझा कंठ दाटला...!!!!

 ©तुषार वाजे (नाशिक)
संपर्क : 9273572706

शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

प्रेम करावं....

*प्रेम दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा !!!

प्रेम करावं आईच्या पायी पडल्या भेगांवर
पुसट होत चाललेल्या बापाच्या हातावरल्या रेघांवर ....





प्रेम करावं आईच्या जीर्ण झाल्या पदरावर

आयुष्य सांधताना फाटलेल्या बापाच्या त्या सदऱ्यावर  ....



प्रेम करावं बहिणीवर अन प्रेम करावं भावावर
आपलं बालपण बघितलेल्या कौलारू घरांच्या गावावर ....



प्रेम करावं उखळावरती, प्रेम करावं जात्यावर
काळासोबत पुसट होत चालल्या आपुलकीच्या नात्यांवर....




प्रेम करावं आजीच्या पंचतंत्रातील गोष्टींवर 
अन प्रेम करावं आजोबांच्या वाढत्या वय पासष्टीवर .....



प्रेम करावं मायेनं भरवलेल्या वरण आणि भातावर
चेंडू लागून पडलेल्या दुधाच्या त्या दातावर .....



प्रेम करावं लहानपणी काढलेल्या निसर्ग चित्रावर
जीवाला जीव देणाऱ्या सखा यार अन मित्रावर.....



प्रेम करावं शिवबा नावाच्या आपल्या थोर बापावर
सह्याद्रीतून घुमणाऱ्या घोड्याच्या त्या टापांवर ......



प्रेम करावं शाळेवर आणि प्रेम करावं शिक्षकांवर
भूमातेच्या रक्षणासाठी सीमेवर उभ्या रक्षकांवर....



प्रेम करावं दिव्यावर अन प्रेम करावं वातीवर
कुशीतून सोनं पिकवणाऱ्या त्या काळ्या मातीवर....



प्रेम करावं कवींवरती आणि तितकच गायकांवर
शेजारणीचा नाद सोडून आपल्या आपल्या बायकांवर.....



प्रेम करावं कविता लिहिताना संपणाऱ्या या लेखणीवर
अन कायम कविता सुचावी म्हणून नटणाऱ्या त्या देखणीवर .....



प्रेम करावं चंद्रावर अन प्रेम करावं ताऱ्यांवर
जात-पात- धर्म विसरून प्रेम करावं साऱ्यांवर....
*प्रेम दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा !!!
कवी :तुषार वाजे (नाशिक)

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

हस देगी भारत माँ भी ....


!!हम सब एक है !!

फिरसे आज इस धरती का लाल 

वतन के खातीर मर गया,

जाने कितनो की आँखे 

आसुओ से वह भर गया |


ऐसे हि कितने वीरो ने 

सीने पर गोली झेली है ,

अपने माँ के रक्षा खातीर 

खून से होली खेली है |


धरम न देखा जाती न पुछी 

जिनके लिये वह लड़ रहे है , 

बरफ, पानी और रेगिस्तान मे

दुश्मन पर भारी पड रहे है |


पर न जाने देशवासियो 

तुमको यह क्या हो गया है ?

धरम जात के रंग मे कही पे 

रंग मानवता का खो गया है |



गीता समझी, कुराण जाना 

बायबल भी हम पढ रहे है ,

पर न जाने धरम के नाम

अपनो मे क्यो लड़ रहे है | 


आपस आपस में लड़ना 
ना धरम कोई सिखाता है ,

सच्ची राह है मानवता की  

हर धर्मग्रंथ वह दिखाता है | 


हस देगी भारत माँ भी 

जब रास्ते हमारे नेक हो जाये 

मानव मानव मे भेद भूलकर 

चलो हम सब एक हो जाये !!!



जय हिंद ! वंदे मातरम !!


-तुषार वाजे (नाशिक)

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

ज्ञान(???)

ज्ञान(???)


पुस्तकांनी भरलीत कपाटं, हार्डडिस्क मधेही जागा नाही,

पण 'ज्ञान' आणि 'कर्मा'ला जोडणारा इंटरनेट वर धागा नाही....



हातामधे आहे GPS तरुणाच्या 

पण कुठे जायचंय कळत नाही,
कशासाठी जगतोय आपण 
याचच उत्तर मिळत नाही......



पैसा घेऊन ज्ञान विकण्याचा सर्वत्र मोठा बाजार झालाय,

'स्वत:'साठीच जगण्याचा प्रत्येकाला आजार झालाय.....



एकमेकांना लाथाळत वर जाणारी

माणसं(?) सर्वत्र भेटू लागलीय,
जमिनीवर पाय ठेवायचीही
लाज सर्वांना वाटू लागलीय.....



पैशाला इथं किम्मत आलीय मोल सरलय इथलं घामाचं,

यालाच जर म्हणतात 'ज्ञान',
मग असलं 'ज्ञान' काय कामाचं, असलं 'ज्ञान' काय कामाचं......


:) कवी-तुषार वाजे :)

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१६

भेटीचा शेवटचा दिवस....

भेटीचा शेवटचा दिवस....*

काय कमावलं काय गमावलं,
याचा हिशोब आज नाही करायचा...
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !


भेटीची तो पहिला दिवस आणि आजचा शेवटचा दिवस....
बघता बघता दोन वर्ष फुलपाखरासारखी उडुन गेली,
विरहाच्या या तळमळीने मने आकांत बुडून गेली.
पण या बुडत्या मनांना आपणच सावरायचं,
मैत्रीच्या छायेत आणून दु:खापासून आवरायचं...
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !


अनेक चुकाही झाल्या असतील माझ्याकडुन अनेक निर्णयही चुकले असतील माझ्याकडुन,
पण आज ते सारं विसरुन जायचं जगुन घेता येईल तेवढं आनंदात जगायचं.....
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !
दहा होते वेडे....


या दोन वर्षातील आठवणी आठवून दाटून येतील ह्रदये.
अश्रू माझ्याही डोळ्यात येतील रडावसं तुम्हाला ही वाटेल.
पण आज तुम्ही नाही रडायचं, स्वतःला सावरून फक्त माझेच अश्रू पुसायचे.
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !


या दोन वर्षातील आठवणींचं मनात एक घर तयार करायचं,
मैत्रीच्या या नात्याचं त्याला कुंपण सुध्दा घालायचं.
पण त्या घरात आता कुणीच नाही रहायचं.
ती अँडव्हान्स बुकींग राहू द्यायची ; आयुष्याच्या थकलेल्या सायंकाळी निपचीत पडण्यासाठी....
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !


या कॉलेज मधील आठवणींना कैद करुन ठेवायचं, 
केलेल्या दंगामस्तीला ह्रदयात भरून ठेवायचं.
जमेल तेवढी सुख-दु:ख गोळा करायची आणि त्या सा-याची एक गुलकंदाची बरणी भरायची,
आठवणींना भुकेलेल्या दिवसांत चाखायला...
पण हे सारं आजच करायचं,
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !

               


दाभोसा ट्रीप
                       

जाता जाता सर्वांनी एक निर्णय घ्यायचा.
आपल्या या मातेच्या 'माझी मुलं' या शब्दाचा विसर नाही पडू द्यायचा.
त्याच प्रेमाला आठवून आकाशी उंच झेप घ्यायची,
आपल्या या मातेची ही पापणी आनंदाने पाणावलेली पहायची.
पण हे सारं आजच ठरवायचं,
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !


शेवटी जाता जाता सर्वांनी मला वचन द्यायचं,
स्वतःला सावरून हसतच रहायचं.
नाही फोन निदान मिस काँल तरी द्यायचा,
तुमचा नाही निदान माझा तरी रुपया घालवायचा.
पण हा रुपया कधीच नाही मागायचा,
कारण आज भेटीचा शेवटचा दिवस ना !



नाही मिस काँल दिला तरी निदान एक करा,
तुषार वाजे नावाचा इसम फेसबुक वर तरी सर्च करा.
तुमच्या रिक्वेस्टची मी जन्मभर वाट पाहीन,
तुमच्या या मैत्रीचा, तुमच्या या स्नेहाचा हा तुषार वाजे आयुष्यभर ऋणी राहील, आयुष्यभर ऋणी राहील.



     ♥♥*By-तुषार वाजे*♥♥

दि.३० आँगस्ट २०११