हल्ली तो लहरी पाऊस खुपच जवळचा वाटतो,
मेघ भरुन आले नाही तरी डोळ्यांत नेहमी दाटतो....
एकदा अशाच पावसामध्ये तु भेटली होती,
जवळ खेचत तुला मी माझ्या
मिठीत घेतली होती....
त्याच घट्ट मिठीमध्ये दिलं होतस एक वचन,
विसरणार नाहीस कधीच मला ठेवशील माझी आठवण....
सोबत जगण्या-मरण्याच्या अनेक शपथा दिल्या होत्या...
न विसरता येणाऱ्या अनेक आठवणी दिल्या होत्या....
त्याच दिवसांत स्वप्नांचे कित्येक इमले रचले होते
सोबत पावसात भिजताना गारांचे खडेही वेचले होते....
पण, तु सोडून जाण्याला आता
कित्येक दिवस लोटले,
तु गेलीस अन आयुष्यात केवळ अश्रूच मला भेटले....💔
सोबत तु होती ना तेव्हा
सवय तुझी झाली होती,
इतकं प्रेम दिलस की शेवटी
व्यसन तु माझं झाली होतीस....
कित्येक पावसाळे बरसून गेलेत आठवणी फक्त राहिल्यात,
तुझ्या मिठीतल्या स्पर्शाच्या जाणिवा फक्त राहिल्यात...
एकटं पावसात भिजण्याची आता हिम्मतच राहिली नाही,
तुझ्याशिवाय या श्वासांनाही
किम्मत राहिली नाही....
आता भरुन येतात जेव्हा काळे मेघ
तेव्हा खिडकीत उभा राहतो,
सरीवर सरी कोसळताना
दुरुनच मी पाहतो....
पावसाच्या त्या सरीँबरोबर
डोळे निरंतर वाहतात,
तुझ्या मिठीची आठवण देऊन
चिंब भिजवत राहतात....!
चिंब भिजवत राहतात.....!!
✒️ ©️कवी : तुषार वाजे ✒
☎️9273572706